Article By Ashwini Aadkar : खडतर परिश्रमाची एकशे एक वर्ष पूर्ण !

Pckhabar-
रयतेमधुनी नव्या युगाचा माणूस आता घडतो आहे।
वटवृक्षाच्या विशालतेचा मोह नभाला पडतो आहे।
 
आज 4 ऑक्टोबर 2020. सुमारे 101 वर्षांपूर्वी जेव्हा ही जनता निरक्षरतेच्या अंधारात चाचपडत होती, गोरगरीब जनतेसाठी शिक्षणाची दारे बंद होती, शिक्षण हीच जणू काही श्रीमंतांची मक्तेदारी होती अशा प्रतिकूल परिस्थितीत भाऊराव पाटील या कर्मयोग्याने एक छोटसं रोप लावलं, ज्याचा वटवृक्ष आज अख्ख्या जगासमोर ’रयत शिक्षण संस्था’ या नावाने  मोठ्या दिमाखात उभा आहे. या वटवृक्षाच्या मुळ्या तर सर्वत्र खोलवर पसरल्या आहेतच, पण याच्या छायेत वाढलेली पाखरे आसमंतात झेप घेण्यासाठी सज्ज आहेत.

थोर शिक्षणमहर्षी, आधुनिक भगिरथ डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी 4 आँक्टोबर 1919 साली काले, ता. कराड जिल्हा सातारा येथे रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली. आज रयत शिक्षण संस्था ही आशिया खंडातील सर्वात मोठी शिक्षण संस्था आहे! लाखो विद्यार्थी आज येथे शिक्षण घेत आहेत. आज बाहेर सर्वत्र कोविडसारख्या आजाराने थैमान घातलेले असताना आज माझ्या रयतचा विद्यार्थी मात्र या शिक्षण प्रवाहापासुन यत्किंचितही दुर झालेला नाही.  ROSE सारख्या online education programme च्या माध्यमातुन सर्व विद्यार्थी शाळेशी, संस्थेशी जोडलेले आहेत! ही माझ्यासारख्या प्रत्येक रयतसेवकासाठी अभिमानाची गोष्ट आहे.

आज या 101 वर्षपुर्ती सोहळ्याच्या निमित्ताने जाज्वल्य इतिहास असणार्‍या या मातृसंस्थेस भविष्यातील उज्वल वाटचालीसाठी माझ्या अनेकानेक हार्दिक शुभेच्छा!!!

 सौ. आडकर अश्विनी दिपक, उपशिक्षिका, संत जिजाबाई कन्या विद्यालय,देहू.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *