हाथरस प्रकरणामुळे भाजपाची प्रतिमा मलीन : उमा भारती

pckhabar-हाथरस प्रकरणामुळे भाजपाची प्रतिमा मलीन झाली, आपण नुकतंच प्रभू रामचंद्रांच्या मंदिरांचं भूमिपूजन केलं आहे. मात्र हाथरसमध्ये घडलेली घटना त्यानंतर पोलिसांच्या कारवाईबाबत समोर आलेलं प्रश्नचिन्ह या सगळ्यामुळे योगी सरकार आणि भाजपाची प्रतिमा मलीन झाली आहे असं उमा भारती यांनी म्हटलं आहे. उमा भारती यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन ट्विट करत त्यांचं मत मांडलं आहे. योगी आदित्यनाथ हे एक पारदर्शी सरकार चालवणारे मुख्यमंत्री म्हणून ओळखले जातात. त्यांनी प्रसारमाध्यमांना पीडितेच्या कुटुंबीयांना भेटण्यापासून अडवू नये असंही आवाहन भारती यांनी केलं आहे.

उमा भारती यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे त्यांना कोरोना रुग्णालयात ठेवण्यात आलं आहे. याबाबतचीही खंत त्यांनी त्यांच्या ट्विट्समध्ये बोलून दाखवली आहे. “मी कोरोना वॉर्डमध्ये अत्यंत अस्वस्थ आहे. मी कोरोना पॉझिटिव्ह नसते तर आज त्या गावातील त्या पीडितेच्या कुटुंबीयांसोबत त्यांच्या घरी बसलेले असते.” असंही त्यांनी त्यांच्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *