Pune News : अजितदादांची राज्यपालांबद्दल मोदींकडे तक्रार

Pckhabar- पंतप्रधानांच्या लक्षात मी एक बाब आणू इच्छितो. अलीकडे महत्त्वाच्या पदावरील सन्माननीय व्यक्ती अनावश्यक वक्तव्ये करीत आहेत. ही वक्तव्ये महाराष्ट्रातील कोणत्याही व्यक्तीस पटणारी नाहीत. छत्रपती शिवाजी महाराज हे रयतेचे राजे होते. महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांनी स्त्री शिक्षणाचा, सत्यशोधनाचा पाया रचला. त्यांचा वारसा घेऊन आपल्याला महाराष्ट्राला पुढे न्यायचे आहे. कोणताही आकस, असूया न ठेवता तसेच विकासात कोणतेही राजकारण न आणता आपल्याला या महामानवांचे विचार पुढे जायचे आहे. हे आपण ध्यानात घेतले पाहिजे.











Leave a Reply