Sports News : तिसऱ्या कसोटीत भारताचा मानहानीकारक पराभव; एक डाव 76 धावांनी इंग्लंडचा विजय

Sports News : तिसऱ्या कसोटीत भारताचा मानहानीकारक पराभव; एक डाव 76 धावांनी इंग्लंडचा विजय
Pckhabar-तिसऱ्या कसोटीत भारताचा मानहानीकारक पराभव करत इंग्लंडने एक डाव 76 धावांनी विजय मिळवला. 5 कसोटी मालिकेत 1-1 ने बरोबरी साधली आहे.

तिसऱ्या कसोटीमध्ये पहिल्या डावात भारताला 78 धावांमध्ये ऑल आऊट केल्यानंतर इंग्लंडने पहिल्या डावात 432 धावांचा डोंगर उभा केला. त्यानंतर दुसऱ्या डावातील फलंदाजीसाठी मैदानात उतरलेल्या भारतीय फलंदाजांनी सुरुवातीला चांगली फलंदाजी करत तिसरा दिवस आपल्या नावे केला.

मात्र चौथ्या दिवशी टीम इंडियाची पुन्हा एकदा घसरगुंडी पाहायला मिळाली. कालच्या 2 बाद 215 वरुन पुढे खेळणाऱ्या टीम इंडियाने आज एका सत्रात उर्वरित 8 विकेट्स गमावल्या. अखेर भारताचा डाव 278 धावांवर संपुष्टात आला. त्यामुळे इंग्लंडने या सामन्यात भारतावर एक डाव आणि 76 धावांनी विजय मिळवला आहे. या विजयासह इंग्लंडने मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *