Maharashtra News: कृषी कायदे मागे घेण्याचा निर्णय हा शेतकरी एकजुटीचा : उपमुख्यमंत्री अजित पवार

Maharashtra News: कृषी कायदे मागे घेण्याचा निर्णय हा शेतकरी एकजुटीचा : उपमुख्यमंत्री अजित पवार

Pckhabar- “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिन्ही केंद्रीय कृषी कायदे मागे घेण्याचा घेतलेला निर्णय शेतकरी एकजुटीचा, महात्मा गांधीजींनी दाखवलेल्या अहिंसा, सत्याग्रहाच्या मार्गाचा विजय आहे, असे मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले” शेतकरी कायदे मागे घेण्याचा योग्य निर्णयाबद्दल मा. पंतप्रधान महोदयांचे आभार. शांततामय मार्गाने दिलेल्या प्रदीर्घ लढ्याबद्दल शेतकरी बांधवांचे अभिनंदन. शेतमालाला किमान आधारभूत दर देण्याचा कायदा केंद्र सरकारने करावा ही मागणीही लवकर मान्य व्हावी. लोकशाहीत लोकेच्छेचाच विजय होतो, हे पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *