IPL news : मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटलमध्ये रंगणार फायनल

IPL news : मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटलमध्ये रंगणार फायनल
Pckhabar-इंडियन प्रीमियर लीगच्या 13 व्या मोसमाच्या सुरूवातीपासूनच दमदार खेळी करणार्‍या दिल्ली कॅपिटलने अंतिम सामन्यात प्रवेश करत प्रथमच इतिहास रचला आहे. क्वालिफायर 2 मध्ये दिल्लीने हैदराबाद संघाचा 17 धावांनी पराभव केला.

दिल्लीने प्रथम फलंदाजी केली आणि 3 गडी गमावून 189 धावा केल्या. प्रत्युत्तरात हैदराबाद संघ 8 विकेट गमावून 172 धावा करू शकला. शिखर धवनने 78 रन करत महत्त्वाची खेळी केली. कगिसो रबाडाने 4 ओव्हरमध्ये 29 धावा देऊन 4 विकेट घेत दिल्ली संघाला अंतिम सामन्यात पोहोचवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. दिल्ली संघ पहिल्यांदाच फायनलमध्ये पोहोचला आहे. पहिल्या क्वालिफायरमध्ये 5 नोव्हेंबर रोजी झालेल्या सामन्यात मुंबईने दिल्लीचा 57 धावांनी पराभव केला होता.

या हंगामात मुंबई संघ चॅम्पियनप्रमाणे खेळला आहे. 14 पैकी 9 सामने जिंकून संघाने प्लेऑफमध्ये 18 गुणांसह पहिलं स्थान पटकावलं. पहिल्या क्वालिफायरमध्ये दिल्लीविरुद्ध 57 धावांनी जिंकल्यामुळे सहाव्यांदा फायनलमध्ये प्रवेश झाला.
विजेतेपद जिंकण्यासाठी आता दिल्ली आणि मुंबई यांच्यातील अंतिम सामना 10 नोव्हेंबरला होणार आहे. सलग दुसऱ्या आणि पाचवी आयपीएल ट्रॉफी जिंकण्याचे लक्ष्य मुंबईचे असेल, तर दिल्लीकडे पहिल्यांदा आयपीएलची ट्राफी जिंकण्याची संधी असेल.